बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती

 

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती  

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी एक डिसेंबरला मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी विविध प्रकारची रणनीती भाजप काँग्रेस आणि आप या तिन्ही प्रमुख पक्षांकडून अवलंबली जात आहे.

ABP-C Voter Survey/ Opinion Poll 2022

पक्ष

२०१७

मताची टक्केवारी

२०२२

अपेक्षित मताची टक्केवारी

नुकसान अपेक्षित

काँग्रेस

४१.४

२९.१

१२.४

भाजप

४९.१

४५.४

३.७

आप

०.०

२०.२

२०.२

इतर

९.५

५.४

४.२

 विधानसभा निवडणुकीत अंदाजित जागा

पक्ष

अंदाजित जागा

 

काँग्रेस

३१ ते ३९

भाजप

१३१ ते १३९

आप

७ ते १५

इतर

 

 

 

 

C-Voter Survey Opinion Poll 2022

पक्ष

२०१७

मताची टक्केवारी

२०२२

अपेक्षित मताची टक्केवारी

नुकसान अपेक्षित

काँग्रेस

४९

४७

२.०

भाजप

४१

३२

९.०

आप

०.०

१७

१७

लोकनीती/ CSDS Opinion Poll 2022

 

पक्ष

२०२२ अपेक्षित

काँग्रेस

२१

भाजप

४७

आप

२२

 

India TV Matrize Opinion Poll 2022

पक्ष

२०२२

अंदाजित जागा

 

काँग्रेस

५९

भाजप

११९

आप

०३

 

गुजरात निवडणुकीसंदर्भात विविध  सर्व्हे एजन्सींकडून केलेल्या सर्व्हेनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. वास्तविक गुजरात राज्यात गेल्या 27 वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तरीही अँटी इन्कम्बनसी वा सत्ताविरोधी वातावरण दिसून येत नाही. लोकनीती- सीएसडीएस संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटलेले आहे की, "बेरोजगारी, महागाई, विकासाचा प्रादेशिक असमतोल इत्यादी मुद्द्यावरून सर्वसामान्य जनता सरकारवर नाराज असली तरी भाजप विरोधात जाऊन मतदान करण्याइतकी नाराज निश्चित नाही. काही सर्व्हे एजन्सींनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील.  परंतु भाजप सत्तेवर हमखास येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्व्हे एजन्सींच्या मताचा विचार केला तर गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतो आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजयाचा दावा खालील मुद्द्याच्या आधारावर केला जातो.

गुजराती अस्मिता आणि ओळखीला महत्त्व-  गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विशेष रणनीतीचा अवलंब केलेला दिसून येतो. भारतीय जनता पक्षाने गुजराती अस्मिता आणि ओळखीला प्रचारात सर्वाधिक जास्त स्थान दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराती ओळखीला अधोरेखित करण्यासाठी स्वतःला गुजरातचे सुपुत्र म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. गुजरात आणि भाजपचे अतुट नाते आहे. गुजरात मला भगवा समुद्र दिसतो. गुजरातने नेहमीच कमळ फुलवले आहे. गुजरात भाजपच्या सेवेसाठी नेहमी तयार असतो अशी भावनिक विधाने करून पंतप्रधान गुजराती अस्मितेच्या आधारावर मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरदार पटेल किंवा मोरारजी देसाई सारख्या नेत्यांची काँग्रेसने केलेल्या उपेक्षेबद्दल सातत्याने विधाने करून काँग्रेस कसा गुजराथी विरोधी पक्ष आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजराती सुपुत्राला काँग्रेसने कसा त्रास दिलेला आहे हे सभेमध्ये आवर्जून सांगत आहेत. भाजप देखील गुजराती शान म्हणून पंतप्रधानाचा उल्लेख करत आहे.

सुशासनाचा प्रचार- गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा गुजरात मॉडेलचे यशाबद्दल देखील बोलताना दिसत आहेत. गुजरात मॉडेलमुळे देशातील इतर राज्यांपेक्षा गुजरात राज्य कसे विकसित बनले असा दावा केला जात आहे. काँग्रेस राजवटीच्या काळात गुजरातची परिस्थिती कशी दयनीय होती हे पटवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत झालेल्या विकास प्रकल्पाची उदाहरणे दिली जात आहेत. भाजपचे सरकार आल्यापासून गुजरातच्या विकासाची घोडदौड सातत्याने सुरू आहे. भाजप सरकारनेच गुजरात विकासाचा नवा मार्ग प्रशस्त केला आहे. भाजपच्या काळात सुशासन अस्तित्वात आहे हे पटवून देण्यासाठी विविध विकास कामांची उदाहरणे दिली जात आहेत. अमित शहा यांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींची उदाहरणे अनेक सभांमध्ये दिली . 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी दंगलखोरांना असा धडा शिकवला की त्यानंतर गुजरात मध्ये दंगल झालेली नाही.

डबल इंजिन सरकारची आवश्यकता-गुजरातच्या विकासात डबल इंजिन सरकारचा खूप मोठा वाटा आहे. गुजरातचा विकास अशाच गतिमान पद्धतीने करावयाचा असेल तर परत डबल इंजिनचे सरकार निवडून देणे गरजेचे आहे हे जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागलेले आहेत.

काँग्रेस आणि आपच्या प्रतिमेवर हल्ला- गुजरात निवडणुकीत प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसची गुजरात मध्ये प्रतिमा खराब करण्यासाठी विविध आरोप केले जात आहेत. काँग्रेस हा गुजरातच्या विकासात बाधा आणणाऱ्या लोकांचा मित्र आहे. गुजरातची जीवन रेखा असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर सारख्या गुजरात विरोधी लोक भारत जोडे यात्रेत सहभागी झाल्यावर भाजपने हा टोमणा मारलेला आहे. मेघा पाटकर यांच्या विरोधामुळे नर्मदा नदीचे पाणी कच्छ व सौराष्ट्राला लवकर पाणी मिळण्यास २० वर्ष विलंब लागला. मेधा पाटकर लोकांना सहकार्य करण्याचे पाप काँग्रेसने केलेले आहे. काँग्रेस नेहमीच गुजरात कडे तुच्छतेने पाहत आलेला आहे. गुजरातची शान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींना मौत का सौदागर सारख्या बदनामीकारक उपाध्या लावून त्यांची बदनामी करत आलेला आहे. गुजरात दंगलीत सहभागी डॉन अब्दुल लतीफ यांना गुजरात पोलीसांनी इनकाउंटर मध्ये अनेक वर्षापूर्वी मारले होते. या लतीफला काँग्रेस गरीबांचा मसीहा मानतो. काँग्रेस जातीवादी, गुंडशाहीचा समर्थक, घराणेशाहीला महत्त्व देणारा आणि फुटीरवाद्यांचा समर्थक आहे अशी प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.

आपने गुजरात मॉडेलच्या उत्तर देण्यासाठी दिल्ली मॉडेल पुढे केलेले आहे. शिक्षण, आरोग्य, जुनी पेन्शन योजना हे जनतेच्या जीवनाशी निगडीत मुद्दे मांडून आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न  करत आहे. आपला शह देण्यासाठी भाजपने त्यांना शहरी नक्षलवाद्याची उपमा दिलेली आहे. हे शहरी नक्षलवादी गुजरात मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजरातच्या तरुणाची दिशाभूल करत आहेत. अशा फुटीरवादी लोकांच्या प्रयत्नाला आम्ही कधी यश येऊ देणार नाही. गुजरातची बदनामी करणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या शक्तींना बाहेरचा रस्ता दाखवा असे आव्हान भाजपकडून केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आ गुजरात में बनव्यू छे' ( मी हा गुजरात बनवला आहे) गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी भावनात्मक विधाने करून गुजरातचे लोकमत आपल्या दिशेने वळवून घेतले आहे.

पराभूत जागावर लक्ष  केंद्रित- भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीने दिल्लीला पाठवलेल्या अहवालात विजय मिळवण्यासाठी त्रासदायक असलेल्या 50 मतदारसंघांचा उल्लेख केलेला आहे. भाजपची अनेक वर्षे सत्ता असूनही या मतदारसंघांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. भाजप सातत्याने पराभूत होत असलेल्या मतदार संघात विजय मिळवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आलेली आहेत. अशा मतदारसंघांमध्ये भाजपचे मुख्य प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे स्टार प्रचारक यांच्या सभा आणि रोडशो आयोजित केले जात आहेत. मागील पाच दिवसात झालेल्या २० सभापैकी १० सभा मागील पराभूत मतदारसंघात झालेल्या आहेत. या मतदारसंघातील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या लोकांची थेट संपर्क करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या नियुक्ती केलेल्या आहेत. विरोधी पक्ष उमेदवारांना विजयी केल्याने मतदार संघाचे कसे नुकसान झाले हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पंतप्रधान केंद्रित निवडणूक- भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने लढवतो आहे. भाजपा जवळपास सर्वच निवडणुका पंतप्रधानाच्या नावाने लढवितो. पंतप्रधानाच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवण्यासाठी त्यांच्या नावाने निवडणुका लढवल्या जात आहेत.

धार्मिक ध्रुवीकरणावर भर-आप आणि काँग्रेसकडून मांडल्या जाणाऱ्या विविध प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी भाजपने विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणावर देखील भर दिलेला दिसतो. 182 जागांपैकी एका ही जागेवर मुस्लिम समुदायाच्या व्यक्तीला तिकीट दिलेले नाही. 2002 च्या दंगलीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी दंगलखोरांना शिकवलेला धडा या अमित शहा यांनी केलेल्या विधानात धार्मिक ध्रुवीकरणाची झलक दिसून येते.  संरक्षणासाठी मोदी हवे आहेत असा प्रचार दरम्यान सत्ताधारी नेत्याकडून लावला जाणारा सूर तसेच अल्पसंख्यांक समाजाविषयी भय व अविश्वास निर्माण करून भाजप धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्याचा प्रयत्न करतो आहे.

तिकीट वाटपात सावधानता गेल्या 27 वर्षापासून भाजप सत्तेवर असल्यामुळे सत्ताविरोधी वातावरणाचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक आमदारांची व मंत्र्यांची तिकिटे कापून नवीन लोकांना उमेदवारी बहाल केलेले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, ब्रजेश मेरजा, आरोग्य मंत्री जय नारायण व्यास, मंत्री आर.सी. मकवाना, राज्यमंत्री अरविंद रयानी, सामाजिक न्याय मंत्री प्रदीप परमार, संसदीय कार्यमंत्री राजेंद्र त्रिवेदी इत्यादी मंत्र्यांचे आणि विद्यमान 84 आमदारांची तिकिटे कापून भाकरी फिरविली. अनेक जागावर नव्या चेहऱ्यांना संधी देऊन लोकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

जातीय समीकरणाचा विचार- गुजरात मधील निवडणुकीतील जातीय समीकरणाचा विचार करून छोट्या मोठ्या 18 जातीय समुदायाच्या लोकांना तिकिटे दिलेली आहेत. प्रभावशाली असलेल्या पाटीदार, प्रजापती, क्षत्रिय, कोली, ब्राह्मण, जैन,अहिर,ठाकोर जात समूहांना अधिक प्रतिनिधित्व देऊन केलेला दिसतो. मोरबी दुर्घटनेचा डाग पुसण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून लोकांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या क्रांती अमृतिया यांना तिकीट देऊन विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

        गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने अंत्यत विचारपूर्वक रणनीतीचा अवलंब केलेला दिसतो. भाजपला काँग्रेस आणि आमचे कडवे आवाहन आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य आहे या राज्यात पराभव होणे भाजपला परवडणारे नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवणे गरजेचे आहे याच उद्देशाने भाजपची प्रचार यंत्रणा काम करते आहे. या यंत्रणेला यश प्राप्त होण्यासाठी आवश्यक रणनीती भाजपने आखल्याचे दिसून येते. संबंधित लेख लिंक-

https://kartavyasadhana.in/view-article/mahendra-patil-on-gujrat-elections-2022

 

you tube video

 you tube video