रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

ऋग्वेदिक काळातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था

 

ऋग्वेदिक काळातील  राजकीय आणि  प्रशासकीय व्यवस्था

लोक पहावर सप्तसिंधूच्या प्रदेशात त्यांना स्थैर्य लाभले आहेत आणि त्यांच्या राजकीय जीवनास बखाते. बातम्या आरशांच्या टोल्या. अनेक कुटुंबांची एक टोळी बनत असे. ती एकत्र कुटुंबपद्धती होती. एका कुटुंबात तीनढ्या राहतात , त्या पितृसत्ताक कुटुंबात प्रचलित होती. सामान्यतः पिता हा कुटुंबप्रमुख असे. वैदिक काळाचा लाभ इ.स. 1500 ते इ.स. 600 पर्यंत आहे . वैदिक कालाचे ऋग्वेदिक आणि उत्तर वैदिक असे दोन भाग केले जातात. ऋग्वेदिक काल इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व 1000 पर्यंत आहे. उत्तर वैदिक कालाचा कालखंड इ.स. पूर्व १००० ते इ.स. पूर्व ६०० पर्यंत मानला गाठ. पूर्व वैदिक काळाला ऋग्वेदिक असे म्हटले जाते. या प्राचीन ऋग्वेद ग्रंथाची  रचना असल्याने ह्या काळाला ऋग्वेदिक असे म्हणतात. उत्तर वैदिक काल हा ऋग्वेदिक काल शांतीचा काळ आहे. या सामवेद, अथर्ववेद , यजुर्वेद रचना रचना आहे. ऋग्वेद अत्यंत सामान्य स्वरूपाची निवडणूक व्यवस्था होती. आरंची व्यवस्था व्यवस्था विभागांमध्ये

१.        कुळ -कुळ म्हणजे कुटुंब किंवा कुटुंब होय. ऋग्वेद कुलातील सर्वात मोठी प्रशासकीय संस्था किंवा कुटुंब होती. कुळाच्या प्रमुखाला कुलप किंवा कुलपती असे म्हणतात. 

२.        गाव अनेकांनी किंवा कुटुंब निर्माण करून असे म्हटले आहे की, गावाला असे म्हणतात. गावाच्या प्रधानाला ग्रामीण असे म्हटले जाते.

३.       विश- वैदिक वितरण अनेक गावांनी घडवून आणले, स्पष्टपणे स्पष्ट केले. विशाच्या प्रमुखाला विशपती असे म्हणतात.

४.       जन - अनेकांनी एकत्रितपणे उघड तयार केले. ज्यांच्या प्रमुखाला राजा किंवा राजन असे म्हणतात. राजाला गोप , गोपती , जनराजन असे म्हटले जाते.

५.       सभा- ऋग्वेदिक काळातील जनतांत्रिक संस्थेला सभा असे म्हटले जात असे. सभा ही एक शक्तिशाली राजकीय संस्था होती. ज्येष्ठ आणि कुलीन वर्गातील लोकांना सभेमध्ये प्रतिनिधित्व दिले जात असे. सभा ही अत्यंत प्रतिष्ठित संस्था असल्याकारणाने सभेने घेतलेला निर्णय बंधनकारक मानला जात असे. न्यायदान करण्याची जबाबदारी देखील सभेकडे दिले जात असे. सभेला असलेल्या व्यापक अधिकारामुळे सभेचा सदस्य होणे तत्कालीन काळात अत्यंत प्रतिष्ठेची बाब होती. सभा ही एक स्थायी स्वरूपाची संस्था होती. तिचे सदस्य समितीकडून निवडले जात असल्यामुळे तिच्या अधीन राहून कार्य करावे लागत असे. समिती संस्थेपेक्षा सभा ही अत्यंत पुरातन संस्था आहे. ऋग्वेदकाळात सभेमध्ये स्त्रियांना देखील प्रतिनिधित्व दिले जात असे. सभेचे सदस्य विविध विषयांवर विचार विनिमय आणि चर्चा करत असत. तत्कालीन काळातील कायदेविषयक बाबींचे निराकरण करण्याचा अधिकार सभेला होता. सभेच्या नियमित बैठका होत असत. राजा देखील सभेत उपस्थित राहत असत. सभेचे सदस्य राजाला राज्यकारभाराबाबत सल्ला देत असत. राजा देखील सभेशी विचारविनिमय करून राज्यकारभार चालवत असे. राजाला देखील सभेचा निर्णय मान्य करावा लागत होता. सभेचे निर्णय राजा आणि जनतेवर बंधनकारक होते.

6.       समिती-ऋग्वेदच्या अनेक भागांमध्ये समिती नावाच्या संस्थेचा उल्लेख सापडतो. समिती ही सभेनंतर अस्तित्वात आलेली संस्था आहे. समिती ही जनजाती किंवा टोळीतील सर्व लोकांची एक संस्था होती. समितीच्या सदस्याला पार्षद  तर अध्यक्षाला ईशान असे म्हटले जात असे. समिती फक्त राजकीय विषयांपूर्ती मर्यादित नव्हती. दार्शनिक प्रश्नावर देखील चर्चा केली जात असे. समितीचा संबंध धार्मिक अनुष्ठान आणि प्रार्थनेची देखील होता. ऋग्वेदकालातील समिती नावाच्या जनतांत्रिक संस्थेच्या माध्यमातून राजा निर्वाचित केला जात होता. राजावर अंकुश ठेवणे आणि त्यांना सहकार्य करणे किंवा पुनर्नियुक्ती करणे हे समितीचे काम होते.  समिती विविध विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेत असे. राजाला देखील समिती समोर उपस्थित राहावे लागत असे. समितीला काही सैनिक कार्य देखील करावे लागत असे. उदा. युद्धाची व्यूहनीती आखणी समितीत उपस्थित राहणे राजाचे कर्तव्य होते. राजा समितीला मार्गदर्शन करणे. जनजाती संदर्भातले नियम निर्धारित करण्याचा किंवा त्यांच्या कार्याचे नियोजन करण्याचा अधिकार देखील समितीला होता.

7.       राजा किंवा राजन-वेदपूर्वकाळात आर्य लोक टोळ्या करून राहत असत. टोळीचे नेतृत्व टोळी नायकाकडे असे. अनेक टोळ्या एकत्र येऊन जन तयार होत असे. जनाच्या प्रमुखाला राजा असे म्हटले जात असे. ऋग्वेदकाळात राजाला गोपती किंवा गोपा असे देखील म्हटले जात असे. कारण त्या काळात पशुधन हे संपत्तीचे महत्त्वाचे साधन मानले जात असे. गाई सारख्या पशूला चलनाचा दर्जा होता. त्यामुळे अनेकदा गाई वरून युद्ध झाल्याचे ऋग्वेदात आढळून येते. ऋग्वेदकाळात दोन मार्गाने राजे निवडले होते. काही जनांमध्ये वंश परंपरागत पद्धतीने राजा निवडला जात असे तर काही ठिकाणी समितीच्या माध्यमातून राजाची निवड केली जात असे. ऋग्वेदकाळात राजाला मर्यादित स्वरूपाचे अधिकार होते. राजा अयोग्य असेल तर त्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची राजा म्हणून निवड करण्याचा अधिकार समितीला होता. सभा आणि समिती सारख्या प्रभावशाली संस्था राजाच्या कारभारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असे. राजा देखील या दोन्ही संस्थांच्या मदतीने राज्यकारभार चालवत असत. राजाला दैनंदिन राज्यकारभारात पुरोहित मदत करत असत. यज्ञ किंवा अन्य धार्मिक विधी बाबत सल्ला आणि मदत करण्याचे काम पुरोहित करत असे. वेदकाळात पुरोहितास प्रचंड महत्त्व असल्यामुळे राजाकडून त्याचा योग्य तो आदर राखला जात असे. सेनेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला सेनापती असे म्हटले जात असे. शस्त्रविद्यामध्ये पारंगत असलेल्या व्यक्तींची सेनापतीपदी निवड केली जात असे. युद्धाच्या वेळेस सेनापती राजाच्या सैन्याचे नेतृत्व करत असत. संरक्षणासंदर्भात राजाला मदत करण्याचे हेतूने सेनापतीची नियुक्ती केली जात असे. ऋग्वेदकाळात लोकांचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, शांतता प्रस्थापित करणे आणि न्यायदान करणे हे राजाचे प्रमुख काम होते. प्रजेकडून धान्य आणि इतर मार्गाने कर जमा करणे इत्यादी कार्य राजा करत असे.ऋग्वेद काळाच्या अखेरच्या टप्प्यात राजाची सत्ता वाढू लागली. राजाला देवाचा अंश किंवा प्रतिनिधी असे मानले जाऊ लागले. धार्मिक आणि न्यायविषयक बाबतीत देखील राजाचे अधिकार वाढले. त्यामुळे राजे अनियंत्रित होण्यास सुरुवात झालेली दिसून येते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

प्राचीन भारतीय राजकीय विचारांचे स्रोत

  प्राचीन भारतीय राजकीय विचारांचे स्रोत -भारतात प्राचीन काळापासून राज्यशास्त्र बद्दल विचार मांडले जात आहेत. भारताच्या राजकीय चिंतनाचे अनेक स...